भिमराव सिरसाठ यांची आत्महत्या नसुन प्रशासनाने केलेली हत्या आहे -एकनाथ पवार
उमरा येथील आत्महत्याग्रस्त दिव्यांग शेतकरी कुटुंबाची सांत्वनपर भेट
नांदेड| लोहा येथिल प्रशासकीय ईमारतीवर भिमराव शिरसाठ या दिव्यांग शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. आत्महत्या का केली याचे गुढ अद्यापही कायम असले तरी शासनाच्या त्रासाला कंटाळुनच आत्महत्या केल्याचा अरोप कुंटुबांच्या वतिने करण्यात आला आहे.
मन्याड फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी पिडित कुटुंबाना भेट देऊन सात्वंन केले.भीमराव शिरसाठ यांची आत्महत्या नसून हत्या असुन या विषयी आवाज दाबल्या जात आहे.हि वेळ गप्प बसण्याची नसुन भिमराव सिरसाठ यांना न्याय देण्याची आहे. मयत भिमराव यांचे बलिदान वाया जाऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया मन्याड फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांनी दिली.
दिनांक ३ जुलै रोजी भिमराव सिरसाठ या दिव्यांग शेतकऱ्याने यांनी तहसिल प्रशासकीय ईमारतीवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे तालुक्यात चांगलेच वातावरण तापले होते. अनेक सामाजीक व राजकीय संघटना एकत्र येऊन तहसिलदार यांना जाब विचारला परंतु तहसिलदार यांच्या तक्रारीवरुन सामाजिक संघाटनेच्या पदधिकाऱ्यावर ३५३ चे गुन्हे दाखल करुन हे प्रकरण वळवण्यात आले आहे.या प्रकरणाला बारा दिवस उलटले असले तरी मतदार संघातील एकाही राजकीय पुढाऱ्यांनी या कुंटुबांला भेट दिली नाही.आज मन्याड फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार व माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी कुंटुबाच्या घरी भेट देऊन सात्वंन केले.
भिमराव सिरसाठ यांच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदीरी घेतली असुन या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. भिमराव सिरसाठ यांची आत्महत्या नसुन ही प्रशासनाने केलेली हत्या आहे.भिमराव सिरसाठ यांना आत्महत्या करायची होती तर प्रशासकीय ईमारतीचीच काय गरज होती. अधिकारी स्वतः ला वाचवण्यासाठी भिमरावचे तहसिलमध्ये कोणतेच काम नसल्याचे सांगुन खोटे बोलत आहेत.सिरसाठ यांचे अनेक कामे या प्रशासकीय ईमारतीत असलेल्या कार्यालयात होती.त्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या केले आहे.
हे प्रकरण अधिकारी यांच्या अंगलट येणार असल्याने सर्व प्रकरणच मैनेज केले आहे. भिमराव सिरसाट हे परत येणार नाहीत परंतु लोहा तालुक्यात दुसरा भिमराव घडता कामा नये यासाठी मोठै अंदोलन उभारले पाहीजे प्रतिक्रिया एकनाथ पवार यांनी दिली. भिमराव सिरसाठ यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी व शेतकऱ्यांना साठी दिल बलिदान दिल आहे.हि वेळ गप्प बसण्याची नसुन सिरसाठ यांना न्याय मिळवुन देण्याची आहे.जोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही तोपर्यंत माजी सैनिक संघटना गप्प बसणार नाही अशा ईशारा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी दिला आहे.
إرسال تعليق