प्रशासनाचा लपर्वाह कारभार पुढे आल्यानं पळसपूर येथील गावकरी झाले आक्रमक
हिमायतनगर (अनिल नाईक) विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठावर असलेल्या पळसपूर येथील घाटावरून वाळू उपसा करण्याचा लिलावासाठी पळसपूर ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन दिलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवून रेती घाटाचा लिलाव झाला आहे. यामुळे ग्रामस्थांनी वाळू उपश्याला विरोध केला असून, चक्क रस्ता अडवून प्रशासनाच्या नाकर्तेपणा व मनमानी कारभाराचा विरोध केला आहे. त्यामुळे रेती घाटाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, प्रशासनाचा लपर्वाह कारभार पुढे आल्यानं आज गुरुवारी दुपारी पळसपूर येथील गावकरी आक्रमक झाल्याचे समोर आले आहे.
हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावचा लिलाव मागील महिन्यात संपन्न झाला. लिलाव झाल्यानंतर देखील आत्तापर्यंत बहुतांश ठिकाणच्या घाटाच्या रेती उपसा करण्याला रितशीर परवानगी दिल्या गेली नाही. लिलाव होण्यापूर्वी तालुक्यातील पळसपूर ग्रामपंचायतीने दि. ३० आगस्ट २१ ला ग्रामसभा लावून गट क्रमांक ५१ ते ५४ साठी लिलाव करण्यास शर्ती व अटींच्या अधीन राहून हरकत नाही असा ठराव दिला होता. त्यामध्ये पर्यावरण विभागाची मंजुरी घेऊन कमीत कमी उपसा करण्यात यावा, रेतीची वाहतूक गावच्या बाहेरील रस्त्याने करण्यात यावी, गांजेगाव बंधाऱ्याची पाणी पातळी सुरक्षित ठेवण्यात यावी अश्या अटीं टाकण्यात आल्या होत्या.
त्यानंतर नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात लिलाव प्रकारीया पार पडली. मात्र हिमायतनगर रेती माफियांनी महसूल अधिकाऱ्यास हाताशी धरून दुसरा गट क्रमांकातील पेंडाचा लिलाव देण्याचा प्रताप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपंचातीने दिलेल्या लिलावाच्या ठरावाला विचारात न घेता लिलाव देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लिलाव देण्यात आला त्या ठिकाणाहून कोपरा येथील पाणी पुरवठ्याची विहीर आणि पाईप लाईन आहे. जर या ठिकाणाहून रेतीचा उपसा झाला तर पाणी टंचाईची भीषण समस्यां उद्भवणार असून, त्यामुळे आज दि.१७ गुरुवार रोजी रेती काढण्यासाठी आलेली वाहने पळसपूर येथील ग्रामस्थानी अडवून प्रशासनाच्या कारभाराचा विरोध केला आहे.
गावकर्यांनी रेतीची वाहने अडविल्याचे समजताच महसूलसाने मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन पळसपूर गाठून गावकर्यांना समजावण्याचा प्रयत्न केला,. यावेळी गावकर्यांनी जेथून रेती उपसण्याचा ठराव दिला त्याचा ठिकाणाहून रेती काढावी असा आग्रह धरला, त्यामुळे रेतीचा झालेला लिलाव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता या संदर्भात तहसीलदारांना आपली भूमिका मांडून रेती लिलावाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे.
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये घेतलेले ऊस अद्यापही कारखान्याने नेला नाही, त्यामुळे शेतकरी अगोदरच हैराण झालेले असताना आता महसूल विभागाने दिलेल्या ठिकाणचा लिलाव न करता दुसऱ्याच गटाचा लिलाव केल्या गेल्याने शेतकरी व महसूल विभागात जुंपली आहे. त्यामुळे आता महसूल विभागाला अगोदरच लिलाव रद्द करून रेतीसाठी ठरावानुसार दिलेल्या गतक्रमांक असलेल्या रेती घाटाचा लिलाव करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांनी रेती उपसा करण्यासाठी जाणाऱ्या वाहनांना मनाई करून दोन ते तीन तासापासून रास्ता अडविला होता. त्यानंतर पोलीस व महसूल अधिकारी गेल्यानंतरही शेतकऱ्यांनी रेती उपाश्याला विरोध केला आहे. त्यामुळे रेती काढण्यासाठी गेलेली वाहने परत आल्याने तूर्तास तरी पळसपूर रेती घाटाच्या उपश्याचा वाद शमला असून, यावर प्रशासन काय तोडगा काढते हे पाहावे लागणार आहे.
إرسال تعليق