त्यानिमित्ताने रविवारी शहरातील मुख्य रस्त्याने निघेल कलशाची भव्य मिरवणूक
वाढोणा शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर निसर्ग निर्मित्त पांडवकालीन युगातील कनकेश्वर तलाव आहे. सध्याच्या हिमायतनगर शहराचे नाव त्याकाळी वारणावती होते. पांडवानी या तलावाला ओमचा आकार दिला आणि द्रोपदीने तलावात शुभ्र कमळाचे फुलं लाऊन मंदिर परिसराला सजविल्याची अख्याइका सांगितली जाते. याचं पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती वरद विनायक गणपतीचे मंदिर चंद्राच्या बिंबावर वसलेले आहे. कालांतराने या ठिकाणी गौंड राज्याचे राज्य अस्तित्वात आले, त्या राजाने वारणावती शहराचे नाव बदलून वाढोणा ठेवले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा दिला होता. ते याच ठिकाणी राहून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार पाहत शेतसारा वसूल करत असे. कालांतराने निजामशाही राजवटी सुरु झाली. त्या काळात हिमायतअली नावाचा सरदार वाढोणा जिल्ह्याला भेट देण्यासाठी आला होता. सर्व जाती - धर्माच्या लोकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावर खुश होऊन हिमायतअली राजाने हिंदू - मुस्लिम समाजासाठी शेतीच्या स्वरूपात भव्य नजराणा बहाल केला. सरदार च्या उपकाराची परतफेड म्हणून हिमायतअली नावाचे नामांतर करून वाढोणा शहराला हिमायतनगर नाव देण्यात आले. तेंव्हाच वाढोणा आज हिमायतनगर नावाने ओळखले जाते आहे.
निजामाच्या राजवटीत या तलवानजीक असलेल्या शिवमंदिरासह अन्य मंदिराची सुरक्षा धोक्यात आली होती. त्या पासून मूर्तीचे रक्षण करण्यासठी येथील काही लोकांनी वरद विनायकाची मूर्ती लिंबाच्या झाडा खालील कंबरे इतक्या खोल खड्यात जपून ठेवली होती. तीच वरद विनायकाची मूर्ती तब्बल दीडशे वर्षानंतर याच अवस्थेत उन, वारा, पावसाचा अनुभव घेत राहिली. सण १९७८ ला तत्कालीन अवतारी पुरुष श्री संत पाचलेगावकर महाराज यांनी हिमायतनगर शहराला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनकेश्वर तलावासह मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविले. त्यावेळी गावातील गणेशभक्त व परिसरातील शेतकर्यांनी श्रमदान केले. संकल्प पूर्ण करण्यासाठी २५ वर्षानंतर नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती श्री प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने गुरुवर्य लाखने महाराज, कांतागुरु आजेगावकर, यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाची सुरुवात करण्यात आली होती. यासाठी येथील छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव काळात केला जाणारा अनधिकृत खर्च टाळून उर्वरित रक्कम, लोकवर्गणी व मजुरीचे पैसे वाचवत वरद विनायकाचे मंदिर उभे केले. उंच टेकडीवरील मंदिरात अष्टभुजाधारी इच्छापूर्ती वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या कसोटीने नेण्यात येउन, विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आज हि मूर्ती सर्वाना आशीर्वाद देत असून, गणेश उत्सव पर्व काळात या ठिकाणी गणेश मूर्तीची पूजा- अर्चना महाभिषेक, महाप्रसादाच्या पंगती केल्या जातात.
त्या वरद विनायक मंदिराच्या समोर कनकेश्वर महादेवाचे मंदिर उभे झाले, महादेव भक्त भास्कर चिंतावर यांच्या पुढाकारातून कनकेश्वर महादेवाची मूर्ती बसविण्यासाठी योगदान दिले. याचा दोन्ही मंदिराच्या कलशारोहण कधी होणार याची प्रतीक्षा भाविक- भक्तांना होती. यासाठी शान्तीलाल सेठ श्रीश्रीमाळ व भास्कर चिंतावार, आदींसह त्यांचे सहकारी आणि शहरातील गणेशभक्त देणगीदारांची सहकार्यातून दि.२४ एप्रिल मिती चैत्र कृष्ण दशमी, शके १९४४ रोज सोमवारी श्री कनकेश्वर महादेव मंदिर आणि श्री वरद विनायक गणपती मंदिराचा कलशारोहन सोहळा आयोजित केला आहे.
तर मिती चैत्र कृष्ण नवमी दि.2४ रविवारी सकाळी ७ वाजता कलशाची भव्य मिरवणूक महिला- पुरुष भाविक- भक्तांच्या सहभागातून शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात येणार आहे. दि.२५ सोमवारी सकाळी ११ वाजता कलशारोहन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगाव, संतश्री देवगिरी गुरु आनंदगिरी महाराज, दत्त संस्थान दिघी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याहून पाचारण करण्यात आलेल्या पुरोहित आणि हिमायतनगर येथील पुरोहिताच्या मंत्रोचार वाणीत मान्यवर दाम्पत्यांच्या हस्ते होम-हवन, पूजाविधी आणि महाआरती होऊन कलशारोहन आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे वितरण होणार आहे.
إرسال تعليق