शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मात्र बहादूर
हिमायतनगर (अनिल नाईक) शहरातील कायमस्वरूपी पाणी पुरवठा योज़नेचे काम १९ कोटीच्या निधीतून मागील ३ वर्षांपासून सुरु आहे. या नळयोजनेच्या टाक्या उभारण्याचे काम संत गतीने होत असल्याने अद्यापही अर्धवट अवस्थेत आहे. तर शहरात पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असून, या कामात पाईपलाईन जोडणीसाठी थेट महावितरण कंपनीला चुना लावत ठेकेदाराकडून थेट वीजतारावर आकोडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. हा प्रकार महावितरण अधिकाऱ्यास माहित असताना देखील कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन स्वहित साधले जात असल्याने दिवसाढवळ्या वीजचोरून नळयोजनेचे काम होत आहे.
हा प्रकार हिमायतनगर येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या ठेकदाराच्या वीज चोरीचा प्रकार उघड करून याची माहिती महावितरण अधिकाऱ्यास दिली. परंतु अधिकाऱ्यांनी वीजचोरीच्या ठिकाणी उपस्थिती न लावता आपल्या दोन कर्मचाऱ्यांना पाठवून विजेच्या लाईनवर टाकलेला सर्व्हिस वायर आणि पाईप कापण्याची ती मशीन जपत केली आहे.
परंत्तू आद्यपही या चोरीच्या घटनेचा पंचनामा केला गेला नसल्याने महावितरण अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून महावितरण अधिकाऱ्याच्या संगनमताने थेट शहरातील मुख्य वीज लाईनवर अकोडा टाकून विजेची चोरी करत नळयोजनेचे काम केल्या जात असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. शहरात अश्या प्रकारे विजेची चोरी केली जात असल्याने याचा भर सर्वसामान्य वीजग्राहकांवर पडतो आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज वापरापेक्षा अव्वाच्या सव्वा विजबिल येत असल्याचे जनतेतून बोलल्या जात आहे.
या संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता नागेश लोणे यांच्याशी सम्पर्क साधला असता ते म्हणाले कि, आमच्या कर्मचाऱ्याने मशीनसह साहित्य जप्त करून आणले आहे. याचा रिशीर पंचनामा होऊन गेल्या दोन वर्षपासून चोरून वीज वापरल्या प्रकरणी संबंधित ठेकदाराला सुरुवातील दंडात्मक कार्यवाही होईल त्यानंतर दंड ना भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असे ते म्हणाले.
याबाबत आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी सांगितले कि, महावितरण अधिकाऱ्यांनी चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे तातडीने घटनास्थळी उपस्थित होऊन पंचनामा करणे क्रमप्राप्त होते. मात्र अजूनही त्यांनी पंचनामा केला नसल्यामुळे महावितरण अधिकाऱ्याच्या संगणमातीने तीन वर्षपासून वीज चोरी करून नळयोजनेचे काम केले जात असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गुत्तेदारावर गुन्हा दाखल करून आत्तापर्यंत वापरलेल्या विजेच्या बाबतीत दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा मी स्वतः पोलिसात याबाबत तक्रार देणार असल्याचे ते म्हणाले.
إرسال تعليق